Monday 22 January 2018

जातीविरहित समाज निर्मितीसाठी

जगात जात फक्त भारतातच आहे, आणि भारतातील राजकारण, समाजकारण व अर्थकारण त्यावर आधारित आहे। समाजात जाती खोलवर रुजल्या व भिनल्या असल्या तरीही योग्य प्रयत्न केल्यास जातीविरहित समाज निर्माण करणे निश्चितच शक्य आहे. याचा उहापोह या लेखात पुढे केला आहे.

Thursday 11 January 2018

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!

अलीकडे शिक्षणमंत्री हे जोकरगिरी सुद्धा करतात असे दिसून येत आहे. अलीकडेच राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी असेच एक विधान करून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूर येथील राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसाच्या निमित्त ८ जानेवारी २०१८ रोजी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध न्यूटनच्या हजार वर्षे आधी वराहमिहीर या भारतीय शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे अभ्यासक्रमात न्यूटनच्या जागी ब्रह्मगुप्ताचे नाव लिहायला पाहिजे.” वृत्तपत्रांनी त्यांचे हे म्हणणे “वादग्रस्त विधान” म्हणून प्रकाशित केले, यातच त्यांच्या विधानाचा फोलपणा दिसून आला.

Sunday 31 December 2017

भारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव 
जोतीराव व सावित्रीमाई यांनी पुणे परिसरात कमीत कमी १८ शाळा काढल्या होत्या. या सर्व शाळांचे संचालन करण्याची जबाबदारी सावित्रीमाई यांच्यावर होती. ती त्यांनी लीलया पार पाडली. इतक्या शाळांचे संचालन करणारी इतिहासातील पहिली संचालिका म्हणून सावित्रीमाई यांचेच नाव घ्यावे लागते. एकापाठोपाठ शाळा काढल्यामुळे तेथे शिकवायला शिक्षक मिळत नव्हते. अशा शाळांमध्ये शिकवण्यासाठी सहसा उच्च वर्णीय शिक्षक तयार होत नसत.

Saturday 30 December 2017

इतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्याची साक्षीदार “पौष पौर्णिमा”


भारतात व जगात पौष पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण व उत्सव म्हणून पाळला जातो. या दिवशी मगध गणराज्याचे राजे बिम्बिसार यांनी त्यांच्या प्रजेसह घेतलेली धम्मदीक्षा, तथागत बुद्धाची श्रीलंकेला भेट इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत. या दिवसाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...

Thursday 23 November 2017

मैत्रीभावानेचा उदात्त संदेश देणारी मार्गशीर्ष पौर्णिमा


सर्व पौर्णिमांप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांची राजा बिम्बिसार यांच्याशी झालेली सुप्रसिद्ध भेट धम्म प्रसाराच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरली. या दिवशी मदांध झालेल्या नालागिरी हत्तीची शरणागती म्हणजे गौतम बुद्ध यांच्या मैत्रीमय व करुणामय व्यक्तित्वाची साक्ष होय. या दिवशी सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेतील अनुराधापुरम येथे बोधीवृक्षाची लागवड केली. या दिवसाचे सविस्तर महत्त्व पुढीलप्रमाणे...

Sunday 5 November 2017

मोठ्या समस्या, साधे उपाय


एका दर्जेदार साबणाच्या कंपनीत नवीच समस्या निर्माण झाली. साबणाच्या दुकानदारांकडून गंभीर तक्रार आली. साबणाच्या मोठ्या खोक्यात पॅक केलेल्या साबणाचे काही डबे रिकामे असलेले आढळून येऊ लागले. कंपनी ग्राहकांशी चिटिंग करते, 144 साबणाच्या खोक्यात एक दोन छोट्या डब्यात साबणच ठेवत नाही, असे आरोप झाले. वास्तविकत: सर्व साबण आटोमॅटिक पद्धतीने पॅक केले जात. कोणी व्यक्ती मुद्दामहून बदमाशी करण्याची शक्यता नव्हती.

Thursday 2 November 2017

कार्तिकी पौर्णिमेचे महत्त्व

इतर पौर्णिमेप्रमाणेच कार्तिक पौर्णिमा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. या दिवशी धम्म संघाची स्थापना, महाप्रजापती गौतमीकडून संघाला चीवर दान, सारीपुत्ताचे परिनिर्वाण, काश्यप बंधूंची दीक्षा, सारनाथच्या मूलगंधकुटी विहारात तथागतांच्या अस्थींची स्थापना इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...

Wednesday 1 November 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्थात विद्यार्थी दिनाची कर्मकहाणी

महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी खास परिपत्रक जारी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. खरे तर हा एक क्रांतिकारी निर्णय असून याचे अत्यंत दूरगामी परिणाम संपूर्ण भारताच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर होणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या शाळेची दुरावस्था



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विश्वप्रसिद्ध व्यक्तीच्या शालेय शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या शाळेचे आज जगप्रसिद्ध स्मारक व्हायला हवे होते; त्या शाळेची आजची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. संबंधितांच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे ही शाळा शेवटच्या घटका मोजत आहे. त्या शाळेच्या दुरावस्थेविषयी माहिती देणारा हा लेख.

Thursday 5 October 2017

अश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.

जगाच्या इतिहासात अश्विन पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी बुद्धाच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते. खरेतर या दिवसाचे महत्त्व आषाढ पौर्णिमा या दिवसापासून सुरु होते.